अवकाळी पावसाचा म्हापशात कहर; नागरिकांची सत्वपरीक्षा

👇Click and Listen

अवकाळी पावसाचा म्हापशात कहर; नागरिकांची सत्वपरीक्षा

म्हापसा: काल मापसामध्ये पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरात हाहाकार माजला. पावसाने इतके जोर धरले की शहरातील रस्ते, नाले आणि गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या. काही भागांत रस्त्यांनी नदीचे स्वरूप घेतले होते. नागरिकांची सत्वपरीक्षा होत होती आणि विकासकामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

शहरात ठिकठिकाणी पाणी साचले

बारदेश मार्केट, र्खोली, म्हापसा मार्केट, करासवाडा, पेट्रोल पंप परिसर अशा अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले. परिणामी अनेक घरांमध्ये व दुकांनांमध्ये पाणी शिरले. नागरिकांचे लाखो-करोडो रुपयांचे नुकसान झाले. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि सामान्य जनतेचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले.

नगरपालिकेची निष्क्रियता उघड

पावसाळ्याआधीची कोणतीही पूर्वतयारी नगरपालिकेने केलेली नव्हती, हे या पावसामुळे स्पष्ट झाले. नाले व गटारींची साफसफाई वेळेत न झाल्यामुळे पाणी साचले आणि शहरातील जलनिच्छासन यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरली. या प्रकारामुळे नागरी व्यवस्थापनावर जनतेचा रोष वाढला आहे.

विकासकामांचा अभाव ठळक

गेल्या अनेक वर्षांपासून म्हापसा मध्ये अपेक्षित नागरी विकास झाला नाही. गटारी व नाले यांचे योग्य नियोजन न झाल्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती उद्भवत असते. यंदाचा पाऊस ही याच अपयशाची पुनरावृत्ती होती. पावसाच्या या रौद्र रूपाने प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल केली.

शिकवण देणारा पाऊस

या पावसाने प्रशासनाला एक धडा दिला आहे – वेळेवर योग्य नियोजन नसेल, तर निसर्गाच्या संकटासमोर कोणतेही विकासकाम थिटे पडते. आता तरी म्हापसा नगरपालिका आणि स्थानिक आमदारांनी यापासून बोध घेऊन पावसाळ्याआधी आवश्यक त्या खबरदाऱ्या घ्याव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment