तेलंगणात ‘रेमल’ चक्रीवादळाचा प्रभावामुळे जोरदार मुसळधार पाऊस आणि वादळात 14 जणांचा मृत्यू.

👇Click and Listen

तेलंगणात ‘रेमल’ चक्रीवादळाचा प्रभावामुळे जोरदार मुसळधार पाऊस आणि वादळात 14 जणांचा मृत्यू.

तेलंगणाची राजधानी हैदराबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळासह मुसळधार पावसाने कहर केला. या वादळासोबत आलेल्या पावसात 14 जणांचा मृत्यू झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘रेमल’ या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम तेलंगणातही दिसून आला. रविवारी रात्री राज्याची राजधानी हैदराबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कहर केला. येथे वादळ आणि पावसामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, वीज आणि संपर्क टॉवरचे नुकसान झाले, वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला. एकट्या नगरकुर्नूल जिल्ह्यात 7 मृत्यू झाले आहेत. हैदराबादच्या वेगवेगळ्या भागांतून 4 आणि मेडक मधून 2 जणांचा मृत्यू झाला.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment