डोंबिवली ठाणे येथील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार; 58 जण आगीत जखमी.
प्राथमिक माहिती समोर आली आहे, एमआयडीसी फेज 2 मध्ये असलेल्या केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 48 कर्मचारी भाजले आहेत.
मुंबईजवळील डोंबिवली, ठाणे येथे गुरुवारी एका रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला. यानंतर आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 48 जण भाजले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज सुमारे तीन किलोमीटरपर्यंत ऐकू आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज 2 येथे असलेल्या केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागली.

कारखान्यातून आतापर्यंत सुमारे ३० जणांची सुटका करण्यात आली आहे. कारखान्यातून ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी आहेत. या स्फोटात अनेक वाहने आणि घरांचेही नुकसान झाले आहे. स्फोट एवढा शक्तिशाली होता की, आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. याशिवाय केमिकल कारखान्यातील आग कारच्या शोरूमसह अन्य दोन इमारतींमध्ये पसरली होती.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, डोंबिवलीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील फेज-२ मध्ये असलेल्या ‘अंबर केमिकल कंपनी’च्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांना तडे गेल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व मृत पावलेल्या लोकांच्या परिवारांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली.











