दिल्लीत पिण्याच्या पाण्याचे संकट, केजरीवाल सरकार विरुद्ध काँग्रेसचे मटका फोड आंदोलन.
दिल्लीत पिण्याच्या पाण्याचे संकट वाढत आहे. राजधानीतील अनेक भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी आसुसलेले आहेत. त्याचवेळी दिल्लीतील काही भागात पाण्याच्या अपव्ययाचे व्हिडिओही समोर आले आहेत. पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे.
पाण्याच्या नासाडीचा फटका आता दिल्लीतील जनतेलाही सहन करावा लागत आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी गळतीच्या समस्येने लोक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणावरुन राजकारण देखील सुरु आहे. दिल्लीतील पाणीटंचाईबाबत आतापर्यंत फक्त भाजप केजरीवाल सरकारवर हल्लाबोल करत होती, मात्र आता दिल्लीत आम आदमी पक्षासोबत लोकसभा निवडणूक लढवणारी काँग्रेसही केजरीवाल सरकारवर हल्लाबोल करत आहे.
काँग्रेस आज दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शने करत आहे. दिल्लीतील पाण्याचा अपव्यय आणि जल संकटासाठी काँग्रेस थेट केजरीवाल सरकारवर आरोप करत आहे. शनिवारी काँग्रेस दिल्लीतील 280 ब्लॉक मध्ये रस्त्यावर उतरून मटका फोडून निषेध करत आहे.
काँग्रेससोबतच भाजपनेही केजरीवाल सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. श्रीनिवासपुरी वॉर्डचे भाजप नगरसेवक राजपाल सिंह म्हणाले की, दिल्लीत पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे भाजप सातत्याने सांगत आहे. पाणी गळतीची समस्या थांबवण्यात केजरीवाल सरकार अपयशी ठरत आहे.










