वाऱ्याला वादळ म्हणणारे, ईव्हीएम च्या नावाने शंख करणारे, “लोकतंत्र खतरे में” असे म्हणणारे, गप्प का आहेत: नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले की, 4 जूनला निवडणूक निकाल येत असताना मी कामात व्यस्त होतो. फोन येऊ लागले. मी कोणाला विचारले की आकडे ठीक आहेत, पण ईव्हीएम जिवंत आहे की मेले आहे ते सांगा. कारण या लोकांचा (विरोधकांचा) भारताच्या लोकशाहीवर आणि देशाच्या लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडाला होता आणि ते सतत ईव्हीएमचा गैरवापर होतोय. यावेळी ते ईव्हीएमची मिरवणूक काढतील, असे मला वाटत होते.
नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परिचित शैलीत सभेला संबोधित केले. त्यांनी गेल्या 10 वर्षात युतीचे यश आणि यशाबद्दलच बोलले.
नरेंद्र मोदींचा हा अंदाज पाहता असं वाटत होतं की ते गटबंधनचे सरकार चालवत नसून ते पूर्ण बहुमताचे सरकार चालवतील, या अंदाजावर असंच म्हणावे लागेल की येणाऱ्या काळामध्ये भाजपाच्या खासदारांची संख्या किती असेल. आताच ते 293 वरून 303 झाले. येणाऱ्या काळामध्ये किती आकडा होईल, याबाबत संपूर्ण भारताला उत्सुकता लागून राहिलेली आहे.










